राज्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा ! काही भागात गुलाब चक्रीवादलाचा परिणाम
![](https://lokmajhanews.com/wp-content/uploads/2021/09/Screenshot_20210927-091804__01-780x470.jpg)
⛈️ *राज्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा ! काही भागात गुलाब चक्रीवादलाचा परिणाम*
बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार असून, काही भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.२७ आणि २८ सप्टेंबरला राज्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे.
🤔 या जिल्ह्यांना पावसाचा इशारा !
🌦️ कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्य़ात २७, २८ सप्टेंबरला काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
⛈️ उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारमध्येही या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा आहे. नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्य़ांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
☔ मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, परभणी, िहगोली, नांदेड आदी जिल्ह्य़ांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
💁🏻♂️ विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्य़ात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर यवतमाळ, गडचिरोलीसह इतर भागांतही पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*